Wednesday, 24 December 2025

Kindness : by Naomi Shihab Nye

 

Before you know what kindness really is
you must lose things,
feel the future dissolve in a moment
like salt in a weakened broth.


What you held in your hand,
what you counted and carefully saved,
all this must go so you know
how desolate the landscape can be
between the regions of kindness.


How you ride and ride
thinking the bus will never stop,
the passengers eating maize and chicken
will stare out the window forever.

Before you learn the tender gravity of kindness
you must travel where the Indian in a white poncho
lies dead by the side of the road.
You must see how this could be you,
how he too was someone
who journeyed through the night with plans
and the simple breath that kept him alive.

Before you know kindness as the deepest thing inside,
you must know sorrow as the other deepest thing.
You must wake up with sorrow.
You must speak to it till your voice
catches the thread of all sorrows
and you see the size of the cloth.


Then it is only kindness that makes sense anymore,
only kindness that ties your shoes
and sends you out into the day to gaze at bread,
only kindness that raises its head
from the crowd of the world to say
It is I you have been looking for,
and then goes with you everywhere
like a shadow or a friend.

......................

Sunday, 14 December 2025

Any dreams ?

 


Graphic - Timeline of technology and human history - by Max Roser (Our World in Data)


 

Chinmay Damle's (slap of a ) post on Facebook : Indigo affected INDIA vs COVID affected Bharat

इंडिगो आणि भारत सरकार यांनी गेले काही दिवस घातलेल्या घोळामुळे हजारो लोकांची गैरसोय झाली. हे लोक २०२० साली लॉक्डाऊनमध्ये आपापल्या घरी सुरक्षित होते. विमानतळावर अडकून पडलेल्या, विमानं रद्द झाली म्हणून इतर मार्गांनी प्रवास करावं लागलेल्या लोकांच्या कैकपट अधिक लोक त्यावेळी रस्त्यावर होते. शेकडो किलोमीटर चालत आपापल्या घरी गेले.

विमानं नसल्यामुळे अडचणीत सापडलेल्या लोकांसाठी रेल्वेनं खास गाड्या सोडल्या आहेत. त्यावेळी सरकारनं मजुरांसाठी रेल्वे सोडाव्या म्हणून कित्येकांना अनेक दिवस विनवण्या कराव्या लागल्या. जेमतेम महिनाभर थोड्या गाड्या गेल्या. मग गावी जायचं तर तिकिटं काढावी लागली. रेल्वेनं तिकिटांची रक्कमही वाढवली होती.

सातारा-सांगली परिसरात एमआयडीसीत बिहारची मुलं काम करतात. जेमतेम पंधरा - सतरा वर्षांची ही मुलं होती, आहेत. पायी पुण्याला आले. रत्नागिरीहून नवराबायको आणि चार व दोन वर्षांची त्यांची मुलं चालत पुण्याला आली.

एकदा पुण्याहून झारखंडला जाणारी ट्रेन रद्द झाली. त्या गाडीसाठी मुंबईहून एक नवराबायको आले होते. बावीस-चोवीस वर्षांचे होते. आदिवासी. ते पुण्याला आले आहेत, हे आम्हाला माहीत नव्हतं. ट्रेन रद्द झाली हे कळल्यावर तसेच चालत मुंबईला गेले. तिथे मदत मिळेना. पण दोन दिवसांनी चालत परत पुण्याला आले. स्टेशनवर एका संस्थेचे कार्यकर्ते जेवण देत होते. त्यांना हे दिसले. त्यांनी सीवायडीए या संस्थेला फोन केला. त्यांनी मला. त्यांना बिलासपूरला जायचं होतं. एरवी मी चौकशी करत असे. पण या दोन संस्थांकडून माहिती मिळाली म्हणून मी चौकशीच्या फंदात पडलो नाही. त्यांना बिलासपूरला जाणार्‍या एका बसचं तिकीट काढून पाठवलं. शेल्टरहून आमचे एक रिक्शेवाले दादा त्यांना बसमध्ये बसवून आले.

चार दिवसांनी सीवायडीएच्या संजनीचा रागावलेल्या आवाजात फोन आला. मी त्यांची चौकशी केली नाही, म्हणून ती चिडली होती. ते नवराबायको बिलासपूरला पोचले. पण त्यांचं गाव तिथून अडीचशे किमी दूर होतं. तिथे ते पायी गेले होते.

मला अनेकदा फोन करून गावी पाठवा अशी विनवणी करणारं एक कुटुंब होतं. मला त्यांना मध्य प्रदेशातल्या त्यांच्या गावी पाठवता येत नव्हतं. एकदा सोय झाली, त्यांना फोन केला, तर कळलं, दागिने विकून त्यांनी ट्रकवाल्याला पैसे दिले, आणि गावी पोचले.

शेल्टरमध्ये एक भुसावळचे काका होते. त्यांची पाठवायची सोय होत नव्हती. शेवटी एकदा त्यांनी अनुपम बर्वेला धमकी दिली, मला गावी पाठवलं नाही, तर जीव देईन.

पायाच्या ऑपरेशनसाठी पुण्यात आलेले एक नवराबायको अडीच महिने अडीच महिने बसस्टॅण्डवर राहत होते.

डेक्कनला पुलाखालची वसती पोलिसांनी पाडली. ते लोक रस्त्यावर आले. पोलिस रस्त्यावरही राहू देइनात. मग ते मुंबईला निघाले. चालत. स्तेशनवरून येताना एकदा अंशुमान आणि मला त्यातली दोन कुटुंबं दिसली. मग त्यांना परत आणलं आणि रेशन दिलं. पाच ते दहा वयोगटातली विसेक मुलं त्या दिवशी मुंबईला लपूनछपून चालत गेली होती.

म्हातारे आईबाप गावी जाण्यासाठी स्टेशनवर येत, त्यांची मुलं आम्हांला सांगत, त्यांची तिकडेच सोय करा, आमच्याकडे पाठवू नका.

मुलगी दवाखान्यात आहे, म्हणून वाहन नसताना मुंबईला निघालेले म्हातारे आईवडील, औरंगाबादजवळच्या खेड्यात जायला निघालेले पुण्यातले तरुण, असे कोणकोण आठवतात. मे महिन्याच्या उन्हात दोनचारपाच वर्षांची मुलं चालत होती.

त्यावेळी त्यांच्या बाजूनं बोलणारं कोणीच नव्हतं. मजुरांच्या पाठीवर एकच सॅक आहे, म्हणजे लोक सुट्टीसाठी घरी निघाले आहेत, अशीच मध्यमवर्गाची समजूत होती.

विमानतळावर अडकून पडलेल्या कितीजणांना कोव्हिडमध्ये चालत गेलेले मजूर आठवले असतील, कोण जाणे.

 

Friday, 5 December 2025

' झाडात पुन्हा उगवाया ' - या जाई गुलमोहर (आपटे) यांच्या वाघूर ( दिवाळी 2022) मधील लेखामधून

माझी अशी इच्छा आहे कि जगातल्या प्रत्येकाकडे एक असे झाड असावे ज्याकडे आपण दुःखी असताना किंवा जगाशी भांडण झालेले असताना हक्काने जाऊ शकू. ज्यापाशी आपण जगाला सांगू शकत नाही अश्या वेदना सांगू शकू. पण असे झाड घरी बसल्या बसल्या मिळत नाही. आपले झाड मिळवणे म्हणजे आपल्या आयुष्याचा जोडीदार मिळवण्यासारखेच जिकिरीचे काम आहे. असे झाड मिळवण्यासाठी असंख्य झाडांचे पर्याय आपल्या समोर असायला हवेत. स्वतः कष्ट करून कमावलेली झाडांची वनराई असावी किंवा आपल्या पूर्वजांच्या कृपेने मिळालेली किंवा जतन केलेली असंख्य झाडांची संपत्ती असावी. हि झाडे कुणाच्याही मालकीची नाहीत, त्यांचे अस्तित्व आपल्याशी बांधील नाही याची पूर्ण जाणीव ठेवून मग त्या झाडाचा शोध करावा लागतो. अनेक झाडांच्या समूहातून वाट काढत काढत, "त्या" झाडाचा पत्ता इतर झाडांना विचारत विचारत मार्ग शोधावा लागतो. आणि अश्या झाडाचा पत्ता फक्त इतर झाडेच देऊ शकतात. अतिशय दाटीवाटीने वाढलेल्या शहरात एक छोटेसे खोपटे शोधण्यासारखे आहे हे. तिथपर्यन्त पोचायला अनेक जणांची मदत घ्यावी लागते. एकच एक झाड बरोब्बर पत्ता देऊ शकत नाही. त्यासाठी शेकडो झाडांशी ओळख करावी लागते. त्यांच्या ओळखीतून एक झाड आपल्याला दुसऱ्या झाडाकडे नेते, मग दुसरे तिसर्याकडे.... पण जर आपल्या आजूबाजूस झाडांची संख्याच अतिशय मर्यादित असेल तर...? मग झाडांना आपले करता येते हेच आपल्याला कळत नाही. त्यामुळे आपल्या ललाटी असे एखादे झाड लिहिले आहे हे देखील लक्षात येत नाही आणि त्याचा शोधही केला जात नाही. मग अश्या वेळी झाडे आपल्या आयुष्यात आपण घरात असताना रस्त्यावरून वाहत जाणाऱ्या ट्रॅफिकच्या आवाजासारखी वाटतात. त्या बॅकग्राऊंडमधील आवाजाचे संगीत बनत नाही. पण काहीवेळेस काही झाडे आपल्या मनात तेवत राहतात. हा लेख अश्या तेवत राहणाऱ्या झाडांना अर्पण करत आहे. 



Rachel Wiley - 10 Honest Thoughts on Being Loved by a Skinny Boy